गोदावरीला पुर आला आतातरी पिण्यासाठी पाणी द्या – मंगेश पाटील 

कोपरगाव प्रतिनिधी, दि .२५ :  धरणं तुडुंब भरली,  गोदावरी नदी दुथडी भरुन वाहु लागली, गोदावरीचे दोन्ही कालवे प्रवाहीत झाले. ओढे नाल्यासह चौहीकडे पाणीच पाणी झाले असतानाही कोपरगावच्या नागरीकांना भर पावसाळ्यात  आठ दिवसाड पिण्याचे पाणी दिले जाते. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या कोपरगावच्या नागरीकांची  भर पावसातही पिण्याची वनवन कमी झाली नाही. दररोज नाही तरी  किमान चार दिवसांनी तरी पिण्याचे पाणी द्यावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी पालीका प्रशासनाकडे केले आहे.

धरणात पाण्याची कमतरता  असल्याचे कारण देत गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगावच्या नागरीकांना आठ दिवसाड तर कधी कधी तर थेट २१ दिवसाआड पाणी दिले जाते. एका बाजुला लाडकी बहीण म्हणून  महीलांचा पैसे देवून सबळ केले जातेय पण  त्याच कोपरगावच्या लाडक्या बहीणींना भर पावसाळ्यात पाण्यासाठी हाल बेहाल केले जाते. कोपरगाव नगरपालिका प्रशासन या महिलांची पाण्यासाठी ची तारांबळ कधी थांबवणार. नाही दररोज स्वच्छ पाणी देता येते तर कमान पाण्याचे दिवस कमी करून ४ दिवसाआड  पाणी द्यावे. 

   नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात  इंडस्ट्रीची एक्सप्रेस फीडर लाईन असून देखील पाण्याची टाकी भरली नाही या नावाखाली किती किती तास वेळेवर पाणी न सोडता महिलांना ताटकळत ठेवतात. पाणी सोडण्यात वेळेचा बदल होत असल्यास त्या भागातील वॉलमन ने फिरून तेथील नागरिकांना पाण्याची येण्याची वेळ निश्चित कळवली पाहिजे.

          उन्हाळ्यात धरणांमध्ये पाणी नाही हे कारण सांगून  १३ ते २१  दिवसाआड पाणीपुरवठा कोपरगाव शहरातील नागरिकांना नगरपालिकेने आजवर  केला.  आता नदीला भर पावसाळ्यातला दुसऱ्यांदा पूर आला. कॅनल भरभरून वाहत आहे, तरीसुद्धा नगरपालिका जनतेला ४ दिवसाआड पाणीपुरवठा पूर्ववत करून का दिला देत नाही.  पिण्याच्या पाण्यावरून कोपरगावच्या जनतेला का वेठीस धरले जाते. जनतेकडून पाणी दिवस कमी करायची मागणी केल्याशिवाय नगरपरिषद प्रशासन पाणी दिवस पूर्ववत चार दिवसाआड का करत नाही.

 ही खेदाची बाब असून पाण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीकडे ज्यामुळे शहरातील महिलांचे मोठ्या प्रमाणात तारांबळ होऊन हाल होतात. पाणी साठवून ठेवण्यासाठी झोपडपट्टी भागात लोक पातेल्यांमध्ये, घागरी मध्ये पाणी साचवतात आणि दुसरीकडे नगरपालिका सांगते की, पाणी साठवून ठेवू नका डेंग्यूचे डास तयार होतात आणि दुसऱ्या बाजूला नगरपालिका पाणी दिवस कमी करायचा गांभीर्याने विचार करायला तयार नाही. एकीकडे खूप डासांचा त्रास आणि दुसरीकडे आठ दिवसाआड पाणी पुरवठा  करुन नगरपालीका प्रशासन नागरीकांच्या जीवाशी का खेळतय असा सवाल माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला आहे.

नागरीक नगरपालिकेला वर्षभराची पुर्ण पाणीपट्टी भरून देखील  नागरिकांना वेळेवर दररोज  स्वच्छ पाणी पिण्यासाठी  का देत नाही याचा खुलासा नगरपालिकेने केला पाहिजे.  आता तर नदीला पूर आलाय,  कॅनल चालू आहे. तरी नगरपालिकेने ४ दिवसाआड तात्काळ पाणी पूर्वत करून स्वच्छ पाणी पुरवठा नागरिकांना करावा असेही पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.