नाशिकच्या धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षाही मुबलक पाणीसाठा

 मागिल वर्ष व चालु वर्ष नगर नाशिककरांना पाणीदार 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : कोपरगावसह अहिल्यानगर, नाशिक तसेच मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी मुबलक पाणी साठा असल्याने नागरीकांच्या पिण्यासह सिंचनाच्या पाण्याची चिंता मिटली आहे. तसेच या वर्षी मे महिण्यातच पावसाने धुमाकुळ घातल्याने भर उन्हाळ्यात धरणातील  पाण्याची मागणी वाढण्या ऐवजी पाणीच नको नको झाले.

यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने राज्यात सर्वञ पाणीच पाणी केल्याने सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निसर्गाने मिटवला त्यातच नाशिक धरण परिसरात जरी पाऊस कमी झाला तरीही गेल्या वर्षीचा पाणी साठा नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील धरणात  आजूनही मुबलक आहे त्यामुळे येत्या पावसाळ्यात हि सर्व धरणं लवकरच काठोकाठ भरतील यात शंकाच नाही. गेल्या  वर्षाच्या तुलनेत यावर्षी संपूर्ण नाशिक धरण परिसरातील उपयुक्त पाणी साठी तब्बल २४.८४ टक्के आहे तर गेल्या वर्षी केवळ ९.४४ टक्के होता.

माञ प्रमुख धरणापैकी  दारणा धरणात सध्या ३५.५६ टक्के  उपयुक्त पाणी साठी आहे. तर गंगापूर धरणात  ४४.४२ टक्के,पालखेड- ३६.६० टक्के, मुकणे- ३४.९१ टक्के, कश्यपी – २८.५६ टक्के, वालदेवी – २०.६५ टक्के, भावली – १६.२५ टक्के, कडवा – १५.८८ टक्के, आळंदी – ११.५ टक्के, गौतमी – ८.८९ टक्के, भाम – ५.२८ टक्के  इतका उपयुक्त पाणी साठा या धरणांमध्ये असुन नांदूर मधमेश्वर बंधारा सध्या १०० टक्के भरलेला आहे. आजून तर खरा पावसाळा सुरु व्हायचा आहे.

चालु वर्षाच्या पावसाळ्यात  १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज सांगितला आहे त्यामुळे  पाण्यावरुन नगर- नाशिक विरुद्ध मराठवाडा  हा वाद होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. जायकवाडी धरणातही सध्या  पाणीसाठी मुबलक आहे त्यातही मान्सुनपुर्व पावसाने सर्वांना दिला दिल्याने पाण्याची टंचाई सध्यातरी  भासत नाही. मागिल वर्ष व  चालु वर्षा सर्वांना पाणीदार जाणार यात कोणतीच शंका नाही.

Leave a Reply