शासनाला दिलेली चाळीस दिवसाची मुदत संपली भातकुडगावात साखळी उपोषणाला सुरुवात

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : येथील नेवासे राजमार्गावरील भातकुडगाव फाट्या वर कामधेनु पतसंस्थेच्या प्रांगणात सकल मराठा समाजाच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या आवहानानुसार साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. प्रारंभी क्षेत्र भावी निमगाव येथील जगदंबा मातेच्या चरणी श्रीफळ वाढवून व छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून येथे नियोजित ठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आले.

अंतरवाली सराटी येथे १७ दिवसाच्या उपोषणा नंतर शासनाला दिलेल्या चाळीस दिवसाची मुदत संपली. तरीही मराठा आरक्षणावर कुठलाही निर्णय न झाल्याने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अन्न पाणी त्याग करून आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणामध्ये जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे, भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, भातकुडगावचे माजी सरपंच शंकर नारळकर, प्रहारचे तालुका अध्यक्ष रामभाऊ शिदोरे, तुकाराम शिंगटे, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे उपस्थित आहेत.

 निषेधासाठी एकजूट परिसरातील गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी करून तशा आशयाचे फलक गावाच्या प्रवेशद्वारावरच लावून शासनाचा तीव्र निषेध केला आहे. साखळी उपोषणास लेखी पत्र देऊन पाठिंबा दर्शविला आहे. अनेक गावच्या सरपंचांनी पाठिंब्याचे पत्र साखळी उपोषणस्थळी येऊन दिले. तर काल पंतप्रधान मोदी यांच्या शिर्डी येथील सभेस नेण्यासाठी आलेल्या एसटी गाड्या रिकाम्याच परत पाठवून आपला निषेध व्यक्त केला आहे. 

यावेळी परिसरातील शिवशाहीर कल्याण काळे, भातकुडगावचे माजी सरपंच राजेंद्र फटांगरे, विठ्ठल फटांगरे, राष्टीय भारूडकार हमीद सय्यद, बक्तरपुरचे सरपंच राहुल बेडके, भविनिमगावचे सरपंच आबासाहेब काळे, बाजार समितीचे उपसभापती गणेश खंबरे, देवदान वाघमारे, गणेश शिंदे, रविंद्र खरड, शिवाजी उभेदळ, महेश दुकळे, उस्मान सय्यद, गोरखनाथ शेळके, रामदास बडे, नारायण आढाव, बाबासाहेब लव्हाळे, हरिचंद्र जाधव, गणेश जाधव, संजय आहेर, दादासाहेब देवढे, अशोक पंडित, अशोक घुमरे, आदींनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे.