ॲड. रश्मी कडू यांना आदर्श उद्योजिका पुरस्कार जाहीर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : जय मल्हार शिक्षणिक व बहुद्देशीय सामाजिक संस्था, अहिल्यानगर यांच्या तर्फै दिला जाणारा राज्यस्तरीय ‘आदर्श उद्योजिका’ पुरस्कार या वर्षा करीता ॲड. रश्मी कडू यांना जाहिर झाला आहे.

ॲड. रश्मी कडू ह्या गेल्या दहा वर्षा पासून कोपरगावच्या सामाजिक व राजकीय कार्यात सक्रीय सहभागी आहे. प्रेरणा फाऊंडेशन संस्थाच्या त्या उपाध्यक्षा आहे. सदर संस्थेमार्फत त्या अनेक सामाजिक उपयोगी प्रकल्प राबवत आहेत. 

त्यांनी कमी कालावधीत बेकरी व्यवसायात केलेली प्रगती लक्षात घेऊन, पुरस्कार निवड समितीने त्यांचा नावाची निवड करून त्यांना उद्योग क्षेत्रामध्ये राज्यस्तरीय पुरस्कारसाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. जय मल्हार शिक्षणिक व बहुद्देशीय  सामाजिक संस्था अहिल्यानगर यांच्या तर्फै हा पुरस्कार दिला जातो.

सन २०२५ करिता हा पुरस्कार ॲड. कडू यांना  जाहिर केलेला आहे. सदर पुरस्कार निवड़ी संबधीचे पत्र संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर  यांनी दिले. सदर पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख मान्यवरांचा उपस्थितीत अहिल्यानगर येथे आयोजित केला आहे. त्यांच्या या पुरस्काराचे निवडी बद्दल समाजाचा विविध स्तारातुन अभिनंदन होत आहे.