संजीवनीच्या १५ विद्यार्थ्यांना झेन्सर टेक्नॉलॉजिज मध्ये नोकऱ्या
कोपरगांव प्रतिनिधी, ३ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने सॅप (सिस्टिम अॅप्लिकेशनस् अँड प्रॉडक्ट्स ) या सॉफ्टवेअर कंपनीशी सामंजस्य करार (एमओयु) केलेला आहे. त्यामुळे या कोर्सचे प्रशिक्षण एका स्वतंत्र विभागामार्फत विद्यार्थ्यांना दिले जाते. तसेच संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभाग आपल्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्यासाठी संपर्क करतो.

अशाच सॅप विभाग व टी अँड पी विभागाच्या संयुक्तिक प्रयत्नातुन झेन्सर टेक्नॉलॉजिज या कंपनीचे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यात कंपनीने अंतिम वर्षातील १५ विद्यार्थ्यांची चांगल्या वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

झेन्सर टेक्नॉलॉजिज ही एक डिजिटल सोल्युशन्स आणि टेक्नॉलॉजी सर्विसेस कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असुन तिचे अस्तित्व जगभर आहे. या कंपनीने नोकरीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पयुटर इंजिनिअरींगच्या राजवर्धन विलास जाधव, सिध्दांत सुधाकर नवथर, श्रीजित पोपट पानगव्हाणे, वेदांत निवृत्ती गोर्डे, गौरी बाबासाहेब चांदर, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या रोहित दत्तात्रय बुळे, शंतनू गोरक्षनाथ ढोकळे,

वैभव परशराम वेताळ, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या शुभांगी प्रमोद आहेर, अथर्वराज सुभाष चोरमुंगे, हर्षद अतुल देसाई, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगची स्नेहा बाळासाहेब शेळके, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या ऋतिका आण्णासाहेब जाधव, आकांक्षा अरूण कार्ले व शुभम आण्णासाहेब देवगिरे यांचा समावेश आहे.

मी संजीवनी पॉलीटेक्निक मधुनच कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा डीप्लोमा केला. डीप्लोमा पुर्ण करीत असतानाच मला संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमधुन विद्यार्थ्यांनी सॅप कोर्स केल्यामुळे अनेकांना नोकऱ्या मिळत होत्या, हे मी पाहत होते. त्यामुळे डीप्लोमा पुर्ण झाल्यावर मी संजीवनी इंजिनिअंरीग कॉलेजमध्येच कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या थेट दुसऱ्या प्रवेश घेण्याचा निश्चय केला आणि मेरीटनुसार मला प्रवेशही मिळाला. शिक्षण घेत असतानाच मी सॅपलाही प्रवेश घेतला. खर तर हा कोर्स पदवी शिक्षण पुर्ण झाल्यावर अनेक विद्यार्थी मोठ्या शहरात जावुन करतात. मात्र संजीवनी कॉलेजने या कोर्सची सुविधा येथेच पुर्ण करण्याची सुविधा निर्माण केली. यामुळे मी सॅपचे ग्लोबल सर्टिफिकेशन मिळवु शकले, ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे. सॅपशी एमओयु असल्यामुळे सॅपच्या सर्वरला आम्हाला डायरेक्ट एंट्री होती. त्यामुळे मी आमच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हॅन्डस् ऑन प्रक्टिस (प्रत्यक्ष प्रशिक्षण ) व अनेक प्रोजक्ट पुर्ण करू शकले. सॅप कोर्समुळे सॉफ्टवेअरर्सचे ज्ञान मिळाले. टी अँड पी विभागाने आमच्याकडून कंपनीच्या पार्श्व भुमीनुसार मुलाखतींचा भरपुर सराव करून धेतला व माझी चांगल्या वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली. संजीवनीमुळे माझे व माझ्या आई वडीलांचे स्वप्न पुर्ण झाले. आमच्या परीवारात यापुर्वी कोणत्याच मूलीला नोकरीची संधी मिळाली नाही, परंतु संजीवनीने माझ्यासाठी नोकरीची संधी दिली, ही माझ्या आयुष्यातील फार मोठी उपलब्धी आहे.
महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी शिक्षण शुल्कात पुर्ण माफी दिली आहे. मलाही शेवटच्या वर्षात या योजनेचा फायदा झाला. म्हणुन पालकांना विनंती करेल की सरकारच्या योजनेचा फायदा घेत आपल्या मुलींना व्यावसायिक शिक्षण देवुन स्वावलंबी करा. मुली व स्त्रीयांना आज समाजातील अनेक वाईट चालीरितीनुसार अन्याय सहन करावा लागतो. म्हणुन त्यांचे जीवन स्वावलंबी बनविण्यासाठी एक मुलगी म्हणुन सर्व पालकांना माझी विनंती आहे.– गौरी चांदर

संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मॅनेजिंग ट्रस्टी अमित केल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
