८५ किलो गोमांस बाळगणारा खाटीक पोलीसांच्या ताब्यात

 कोपरगाव प्रतिनिधी दि. ४ : कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची नुकतीच नाशिक येथे बदली झाली त्यामुळे  गोमांस विक्रेत्यांनी गोवंश जनावरांची कत्तल करण्याचे धाडस सुरु केले. माञ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आजूनही कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या पदभार सोडला नाही अशातच शहरातील संजयनगर आयेशा काॅलनी  परिसरात अरबाज माजिद कुरेशी हा आपल्या राहत्या घरात चोरून गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याची गुप्त माहीती भगवान मथुरे यांना कळताच त्यांनी आपल्या पथकासह धडक कारवाई करून तब्बल ८५ किलो गोमांस पकडून अरबाज माजिद कुरेशी याला ८ हजार ९०० रूपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

  पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील संजयनगर आयेशा काॅलनी येथील अरबाज माजिद कुरेशी हा घरामध्ये गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तल करत असल्याची माहीती मिळाली असता सोमवारी २ जुन रोजी पोलीसांनी त्याच्या  घरी छापा टाकला असता तिथे तब्बल ८५ किलो गोवंश जनावरांचे मांस आढळून आले सोबत कापण्यासाठी लागणारे साहित्य मिळाले संपूर्ण ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेवून पोलीस कर्मचारी गणेश वशिष्ट काकडे यांच्या फिर्यादीवरून अरबाज माजिद कुरेशी यांच्यावर बेकायदेशीर त्यांच्या राहत्या घरी गोवंश जनावरांची कत्तल करुन ते गोमांस आपल्या ताब्यात  बाळगल्याचे  मिळून आला यावरून गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कोपरगाव  शहर पोलीस स्टेशनमध्ये अवघ्या ९ महिण्याच्या कार्यकाळात अनेक कारवाया करुन गोवंश जनावरांना जीवदान दिले.

 गोवंश जनावरांची कत्तल कोपरगाव शहरात काही ठराविक कुटुंब वारंवार करत असतात त्यांच्यावर कोणाचाही धाक नसल्याने गोवंश जनावरांची कत्तल हा नित्यक्रम सुरु होतो त्याला खंडीत करण्याचे काम पोलीस निरीक्षक मथुरे यांनी केले अगदी बदली झाली तरी जाता जात कारवाई करुन गोवंश जनावरांच्या गळ्यावर सुरु फिरवणाऱ्यांना गजाआड केले.

 इतकेच नाही तर त्यांच्या कारकिर्दीत ज्यांनी ज्यांनी पुन्हा पुन्हा गोमांस प्रकरणात किंवा कत्तलीच्या संदर्भात वारंवार तेच आरोपी सापडले त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्याची तजवीज केली असल्याने येत्या काही दिवसांत गोवंश जनावरांची  कत्तल करणारे तडीपार होण्याची शक्यता अधिक आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply