नाशिकच्या धरण परिसरात पाण्याची आवक वाढली

दारणाधरण ४० टक्के भरले

कोपरगाव प्रतिनिधी दि. १५ : गेल्यावर्षी गोदावरी नदीला पुरस्थिती होती माञ या वर्षी धरणं अर्धवट अवस्थेत असल्याने नगर-नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्यातील नागरीकांचे लक्ष नाशिकच्या धरणाकडे लागले आहे.

  नाशिक-नगर जिल्ह्यासह मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या दारणा धरण कधी शंभर टक्के भरते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष दरवर्षीअसते. जर दारणा धरणासह नाशिकचे इतर २३ छोटे मोठे धरण बंधारे पुर्ण क्षमतेने भरली नाही तर नगर नाशिक विरूद्ध मराठवाडा पाणी प्रश्न भेटल्याशिवाय राहत नाही. आता या वर्षी जर वेळेत सर्व धरणं भरली तरच पाणी प्रश्न काहीशा शांत होवू शकतो.

यावर्षी जून महीला संपला तरीही नाशिकच्या धरण परिसरात अपेक्षित पर्जन्यमान नसल्याने बहुतांशा धरणं कोरडी आहेत. जून महीना संपला तरीही अनेक धरणात पाणी नाही, म्हणुन पिण्याच्या पाण्यासाठी कोपरगावच्या नागरीकांना पावसाळ्यातही १२ दिवसाआड पाणी पिण्याची वेळ आली. माञ चालु आठवड्यात नाशिकच्या धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणात १ जुलैला केवळ ३ टक्के पाणी साठा होता तो सोमवारी १५ जुलै रोजी थेट ४० टक्क्यांवर गेला आहे.

गेल्या वर्षी धारणा धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत होती. माञ सध्या गोदावरी नदीत पावसाचे पाणी वगळले तर पाणी नाही. गतवर्षी १४ जुलै रोजी गोदावरीला पुरस्थिती होती. 

 दरम्यान  नाशिकच्या धरण परिसरात जर सलग पंधरा दिवस दमदार पाऊस पडला तर सर्व धरणातील पाणीसाठा वाढू शकतो अन्यथा या परिसरातील पाण्यावर विसंबून राहणाऱ्यांची धाकधूक वाढण्याची शक्यता आहे. सध्या नाशिकच्या धरणातील सध्या साठलेल्या पाण्याची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. 

 दारणा – ४०.१३ टक्के, भाम -४३.४३ टक्के, भावली – ५२.६५ टक्के, गंगापूर – ३३.३२ टक्के, कडवा – ३६.०८ टक्के, गौतमी -२५.६४ टक्के, मुकणे – १४.०२ टक्के, वालदेवी – १५.४३ टक्के, कश्यपी – ११.५० टक्के, आळंदी – २.८२ टक्के, पालखेड १४. ९ टक्के भरले आहे. तर ओझर, तिसगाव पुणेगाव ही धरणे आजूनही कोरडीच आहेत.

गोदावरी नदीवरील नादूंरमधमेश्वर बंधारा सध्या पावसाच्या पाण्याने शंभर टक्के भरल्याने गोदावरी नदीतून जून पासुन आत्तापर्यंत २ हजार ९५१ क्युसेक्स  अर्थात २५५ दशलक्ष घनफूट पाणी मराठवाड्याच्या जायकवाडी धरणाकडे झेपावले आहे. १ जुलै २०२४ रोजी दारणा धरणात केवळ ३ टक्के पाणी साठा होतो माञ अवघ्या  पंधरा दिवसांत तब्बल ३७ टक्के नवीन पाण्याची आवक झाल्याने धरणाच्या पाण्याची पातळी वाढली आहे. जोपर्यंत नाशिक धरण परिसरात सलग मुसळधार पाऊस होणार नाही तोपर्यंत नगर नाशिक सह मराठवाड्यातील नागरीक समाधानी होणार नाहीत.