स्वातंत्र्यवीर आणि हिंदूह्रदय सम्राट या पदव्या भारतरत्ना पेक्षा मोठ्या – रणजीत सावरकर

शिर्डी प्रतिनिधी, दि. २५ :  स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिंदू जनतेनं स्वातंत्र्यवीर आणि हिंदूह्रदय सम्राट अशा पदव्या बहाल केलेल्या आहेत. त्या भारतरत्ना पेक्षाही मोठ्या असून त्यांना भारतातील सर्वोच्च पदवी भारतरत्नची गरज नसल्याच खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी शिर्डीत सांगितले.

शिर्डीतील मंदिर परिषदेच्या निमित्ताने आलेल्या सावरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, भारतरत्न हा पुरस्कार दिग्गजांना दिला जातो. मात्र त्याचबरोबर काही अशा लोकांना देखिल दिला गेला की ज्यांच नाव आपण घेवू शकत नाही. 

भाजपा सावरकरांना भारतरत्न कधी देणार अशी विचारणा अलीकडे उद्धव ठाकरे करत आहेत. यावर बोलताना रणजीत सावकर म्हणाले की, ज्यांनी आपला पक्ष कॉग्रेसच्या दावणीला नेवून बांधला, जे राहूल गांधीच्या मांडीला मांडी लावून बसतात ज्यांना सावरकरांच तत्वज्ञान मान्य नाही त्यांनी सावरकरांना भारतरत्नाची मागणी करावी? त्यांचा काय संबध? अशा शब्दात रणजीत सावरकर यांनी उद्धव ठाकरेंवर टिका केली.

हिंदूंच्या टॅक्सवर बांग्लादेशी घुसखोर मुस्लीम समुदायाची लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला पाहीजे अन्यथा हिंदूची लोकसंख्या वाढवली पाहीजे असेही ते म्हणाले. मुस्लिम लोकसंख्या आठ टक्क्यावरून बावीस टक्के झाली असून पुढील निवडणूक मुस्लिम समुदाय ठरवणार अशी परिस्थिति निर्माण झाल्याच रणजित सावरकर म्हणाले.