पन्नास वर्षांने पन्नास मिञ मैञीनींचा अनोखा संगम – अरविंद भनसाळी 

 शाळेला प्रेमाची भेट म्हणून लाखाची देणगी

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ :  गेल्या पन्नास वर्षांपासून राज्यासह देशाच्या विविध कानाकोपऱ्यात कामानिमित्ताने विखुरलेले एका वर्गांतील पन्नास मिञ मैञीनी कोपरगाव येथे स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकवटून आपल्या जून्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी शाळेला  लाखाची  अर्थीक मदत करीत शिकवणाऱ्या गुरूजनांप्रति कृतज्ञता  व्यक्त केल्याची भावना प्रसिद्ध उद्योजक अरविंद भनसाळी यांनी व्यक्त केले.

कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात सन १९७३-७४ या वर्षात इयत्ता १० वीत शिक्षण घेतलेल्या  परंतू विविध कारणाने विखुरलेले तब्बल ५० माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उद्योजक अरविंद भनसाळी  यांच्या विशेष प्रयत्नातून नुकताच आयोजीत करण्यात आला. शिर्डी येथील तानिया प्रेसेंडेन्ट इन व श्रीमान गोकुळचंद विद्यालयात कोपरगाव येथे दोन दिवसीय माजी विद्यार्थांचा स्नेहमेळावा (गेट टुगेदर) आयोजित करण्यात आले होते.

या माजी विद्यार्थ्यांमध्ये  प्रसिद्ध उद्योजक अरविंद भनसाळी, सुहास कुलकर्णी, ठाण्याच्या प्रसिद्ध लेखिका शुभदा विध्वंस, पुण्याचे विधीज्ञ एन आर पोरवाल, सुधा कासलिवाल(नाशिक), शुभदा जोशी (कोल्हापूर), पुष्पा शहा (पुणे), कोपरगावचे  माजी नगरसेवक अनिल जाधव, डॉ. विवेक सुर्यवंशी, मंगल बोरा, आदी विद्यार्थीसह अनेकांनी एकञ येवुन आपल्याला शिकवणाऱ्या  गुरुजनांचे पुजन करुन त्यांचा सत्कार केला.  दोन दिवस चाललेल्या या स्नेह मेळाव्यात आजोबा आजी झालेल्या या विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम केले. गित गायन, कविता सादर करीत स्नेहमेळाव्यात हास्य विनोदाचे फवारे उडवले.

 अनेक वर्षांपासून न भेटलेल्या वर्गमिञांना पाहुन  एकमेकांना प्रेमाने आलिंगन देत स्नेह पुर्वक चौकशी करीत शालेय जीवनासह जून्या आठवणींना उजाळा  दिला. तब्बल ५० वर्गमित्र एकाचवेळी ५० वर्षाने एकाचवेळी भेटण्याचा हा दुर्मिळ योगायोग आहे. यावेळी नारायण अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले.

 हा विस्मरणीय स्नेहमेळाव्याचा योग घडवून आणुन ५० वर्षापुर्वीच्या वर्गमिञांना  एकञ आणण्यासाठी  प्रयत्न करणारे अरविंद भनसाळी, सुहास कुलकर्णी व शुभदा विध्वंस यांचा सत्कार करीत आभार व्यक्त केले.  शाळेला लाखाची अर्थीक मदत केल्या बद्दल शाळा व्यवस्थापनाच्यावतीने या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.