रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याने ग्रामस्थांनी केला आमदार राजळेंचा सत्कार

शेवगाव प्रितिनिधी, दि.२५ : रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाल्याने त्यावरून पायी चालणेही मुश्कील होते. अशावेळी कोणी आजारी पडले, गरोदर महिला अडली तर मोठे हाल होतात. पावसाळ्यात शाळकरी मुलामुलींना या रस्त्यामुळे नाईलाजाने शाळेला अनेकदा दांडया माराव्या लागत.

ग्रामस्थांनी ही व्यथा आमदार मोनिका राजळे यांच्या पुढे मांडली आणि त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत रस्ता मुख्यमत्री सडक योजने अंतर्गत लगेच मार्गी लावून पूर्ण केला. आता या मार्गातून जाणाऱ्या सुर्यकान्ता नदीचा अडसर बाकी होता. तोही प्रश्न आ. राजळे यांनी  सोडविल्याने माळीवाडा ग्रामस्थांनी आज मंगळवारी त्यांचे निवासस्थानी जाऊन आभार व्यक्त  करत त्यांचा सत्कार केला.

शेवगाव ते दादेगाव (दारकुंडे वस्ती) या रस्त्याचे काम मुख्य मंत्री सडक योजने अंतर्गत पूर्ण करण्यात आले.  या रस्त्यावरील सुर्यकान्ता नदीवर पुल होणे गरजेचे होते. त्यासाठी युवा शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष साईनाथ आधाट यांनी पाठपुरावा केला.

आता ह्या पुलाच्या बांधकामास मंजूरी  मिळाली असून तब्बल दोन कोटी ३८ लाख रु खर्चाच्या  प्रशासकीय कामास मान्यता मिळाली आहे. त्याचे टेंडर होऊन वर्क ऑर्डर देखील झाली असल्याने त्याबद्दल माळीवाडा ग्रामस्थांनी आ. मोनिकाताई राजळे यांचे निवासस्थानी जाऊन त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करत  साईनाथ आधाट, ज्ञानेश्वर शिंदे, प्रविण शित्रे, संजय वाघमारे, गहिनीनाथ लाड, प्रसाद डाके, सिंद्धांत आधाट, दादा म्हस्के या माळीवाडा ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.