ताजनापुर उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक दोनचे काम जून अखेर पूर्ण होणार – आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : ताजनापुर उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक दोनचे काम जून अखेर पूर्ण होणार असून योजनेसाठी राज्य शासनाने शंभर कोटी पेक्षा जास्त रकमेची तरतूद केली आहे, चालू अर्थसंकल्पामध्ये 36 कोटी रुपयांची तरतूद झाली असून उर्वरित कामासाठी 34 कोटी रुपयांची पुरवणी अर्थसंकल्पात मागणी केल्याची माहिती आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.

        शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागाला संजीवनी ठरणाऱ्या ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा दोन नचे दोन वितरण कुंडातून यशस्वी पाणी चाचणी आज शुक्रवारो घेण्यात आली, यावेळी आमदार राजळे यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचनाद्वारे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार असून तत्पूर्वी सदर वितरण कुंडातील पाणी कुंडा जवळील सोनेसांगवी, चापडगाव, प्रभूवाडगाव, गदेवाडी खामपिंपरी आदी गावातील बंधाऱ्यात सोडण्यास सुरुवात करण्यात आली.

यावेळी  संबंधित गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी  यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे,  बापूसाहेब पाटेकर, भीमरावजी सागडे, उपसरपंच सुरेशराव नेमाने, बंडू गायकवाड, केशव आंधळे,  सत्यनारायण मुंदडा, ह भ प झुंबड महाराज, कृष्णा नेमाने,  राजाराम गायकवाड,  साईनाथ गायकवाड, शिवाजी गोरे,  सावता गायकवाड, नारायण मडके, सोमनाथ मडके, रावसाहेब लवांडे, भगवान तेलोरे, राजाराम तेलोरे, हरिभाऊ झुंबर मामा, कृष्णा झुंबड, एकनाथ खोसे, गणेश थोरात, जगन्नाथ भागवत, मधुकर गोरे,  आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच ताजनापुर उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, प्रकाश थोरात, उपकार्यकारी अभियंता श्रीहरी कुलकर्णी, शाखा अभियंता महेश चौरे व सदर कामाचे ठेकेदार उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आ. राजळे म्हणाल्या, योजनेचे  काही कालावधीत संत गतीने काम चालू होते परंतु सध्या शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत आहे, तसेच योजनेवर काम करणारे अधिकारी वर्ग, कर्मचारी व संबंधित ठेकेदार तत्परतेने काम करत असल्याने येत्या सहा सात महिन्यात योजनेचे काम पूर्ण होईल. काम करत असताना श्रेय घेणे हा उद्देश न ठेवता जनकल्याणासाठी काम करणे हा उद्देश समोर असतो.

शेवगाव तालुक्यातील खानापूर, अंतरवाली, घोटण, बाबुळगाव, राक्षी, कुरडगाव, रावतळे, मळेगाव, गदेवाडी, ठाकूर निमगाव, सोनेसांगवी, कोळगाव,  हसनापूर, वरखेड, चापडगाव, दहिगाव शे,  मंगरुळ खुर्द व  बुद्रुक, अंतरवाली बु. या गावातील सुमारे 6960 हेक्टर  क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. शेजारील इतरही गावांची योजनेत समावेश करण्यासाठी मागणी असून सदर योजना यशस्वीरित्या सुरू झाल्यानंतर उर्वरित गावांचाही समावेश करणेबाबत सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.