फोनवर बोलून प्रेम करणाऱ्या मुलींना आई-बापांच प्रेम का दिसत नाही? – सुरेश चव्हाणके

जनआक्रोश मोर्चामुळे कोपरगावमध्ये धडकले भगवे वादळ

 कोपरगाव प्रतिनिधी दि. २०: जो व्यक्ती कधी पाहिला नाही, कधी भेटला नाही, त्याच नाव गाव निट माहीत नाही, अशा अनोळखी व्यक्ती बरोबर मोबाईल वर गप्पा मारुन व चॅटिंग करून प्रेम होतं असेल तर त्या आईने नऊ महिने पोटात वाढवून जन्म दिला. २० वर्ष  रक्ताचा पाणी करुन सांभाळणाऱ्या आई-बापाचं प्रेम या मुलींना का दिसत नाही किंवा त्यांच्यावर प्रेम का होतं नाही असा सवाल धर्मरक्षक सुरेश चव्हाणके यांनी कोपरगाव येथील जन आक्रोश मोर्चाला संबोधित करताना केला. 

युपीमध्ये लव्ह जिहादची घटना जर मदरशात घडली तर योगी बाबाचा बुलडोझर फिरतो. पिझ्झा बर्गर ऑनलाईन मागवला तर ३० मिनिटे लागतात, पण योगीचा बुलडोझर अवघ्या २५ मिनिटांत येवून उध्वस्त करतो. 

कोपरगावच्या एका युवतीवर अत्याचार करुन धर्मांतर करण्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडल्याने त्या घटनेचा निषेध म्हणून हिंदू जनजागृती करण्यासाठी शहरात गुरुवारी सकाळी १० वाजता सकल हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कोपरगाव तालुक्यासह विविध ठिकाणांहून हजारो नागरिक मोर्चामध्ये सामिल झाल्याने कोपरगाव शहरात भगवे वादळ धडकल्याचे चिञ दिसत होते. डोक्यावर भगवी टोपी, हातात भगवे ध्वज घेवून हजारो नागरिक लव्ह जिहाद प्रकरणावरून आपला आक्रोश घोषणा देवून व्यक्त करत होते. या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा या मोर्चात सहभाग होता.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका पासून मोर्चाला सुरूवात झाली. गांधी चौक, एसजी  विद्यालय, छञपती संभाजी महाराज पुतळा मार्गे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत काढण्यात आला. येथे मोर्चाचे रूपांतर विराट सभेत झाले. या सभेच्या वेळी  बोलताना सुरेश चव्हाणके पुढे म्हणाले की, धर्मांतरांच्या घटना या पुढे राज्यात चालु देणार नाही. त्या विरोधात कायदा झाला पाहिजे. राज्यातल्या गडकिल्ल्यांमध्ये मदरशा, मस्जिदी वाढत असुन तिथे  हिरवे झेंडे व चादरी फडकत आहेत, एक महीन्यात ते सर्व उद्ध्वस्त करा. संपुर्ण पाकिस्तानात ३५ हजार मदरशा आहे. माञ एकट्या महाराष्ट्रात तब्बल ७४ हजार मदरशा आहेत. मदरशा मुळे पाकिस्तान कंगाल झाल्याचे तेथील  लष्करी अधिकारी सांगतात, मग आपल्या राज्याचं भविष्यात काय होवू शकते यावर लक्ष वेधले.

ते पुढे म्हणाले, सध्या मुस्लिम अल्पसंख्याक राहीले नसुन त्यांची संख्या अनेक पटीने वाढली असल्याने त्यांचा अल्पसंख्याक दर्जा कमी करून अल्पसंख्याक मंञालयाला टाळ ठोकले पाहिजे. हिंदूंच्या करातून मदरशांना अनुदान दिले जाते आणि त्याच मदरशांमध्ये हिंदू विरोधात धडे शिकवले जातात. जगातला सर्वात भोळा हिंदू समाज आहे. स्व:ताच्या पैशातुन स्व:ताचा जीव धोक्यात घालतोय. यापुढे हिंदुंनी सावध भुमीकेत जगलं पाहिजे. स्व:ताचे उद्योग- व्यवसाय वाढवले पाहिजे, राज्यातल्या बॅंका, पतसंस्थांनी हिंदू तरुणांना त्वरीत कर्ज उपलब्ध करून सहकार्य करावे. हिंदूसाठी लढणाऱ्यांना सहकार्य करा. कोणत्याही राजकीय पार्टीत रहा, पण हिंदू रहा. जातीवाद सोडला पाहिजे. जातीपेक्षा धर्म मोठा आहे. कोपरगाव शहरात घरोघरी चालणारे कत्तलखाने बंद केले नाही तर आम्ही घरात घुसुन पुरावे देवू. असे म्हणत चव्हाणके यांनी उपस्थितांना कानपिचक्या दिल्या. 

 या मोर्चा मध्ये माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार आशुतोष काळे यांच्या मातोश्री पुष्पाताई काळे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, विजय वहाडणे, रविंद्र बोरावके, कैलास ठोळे, सपना मोरे, विद्या सोनवणे, सुनिल गंगुले, दत्ता काले, पार्श्वगायीका सुरभि कुलकर्णी, यांच्यासह विविध क्षेञातील, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला यांचा मोठा सहभाग होता. साधु महंतांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करून मोर्चाला सुरुवात झाली. तर ११ युवतींच्या हस्ते तहसिलदार, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देवुन मोर्चाची सांगत करण्यात आली. या मोर्चाच्या कार्यक्रमाचे सुञसंचलन  संतोष गंगवाल यांनी केले.

दरम्यान आज दिवसभर कोपरगाव शहरासह  तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. तर मोर्चेकऱ्यांना व बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीसांना विविध संघटनांनी अल्पोहार, पाणी, बिस्किटे देवून माणुसकीचे दर्शन घडवले. कोपरगावच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चा  निघाल्याने सर्वांचे लक्ष या मोर्चाकडे होते. कोणताही अनुचित प्रकार न घडवता मोर्चा शांततेत झाला.